कधी कधी वाटतं तुझ्याशी खूप खूप बोलावं,
मनातलं ह्रिदयातलं एकदा सगळं सांगून टाकावं…
पण क्षणातच हे मन त्या ह्रिदयाला सांगतं,
भिंतीवरचा त्या फोटो समोर आपण किती काळ उभं राहावं…
कधी कधी वाटतं तुझ्याशी खूप खूप बोलावं…
कित्येकदा हे मन सांगतं आपल्या आठवणींचे किस्से,
तुला आठवतं का गं… युनिवर्सिटीचा तो रोड आणि ते सायकल रिक्शे
त्या रिक्श्यात बसून तू कॉलेज ला यायची,
आणि माझ्या सायकलीला बघून उगाच नाक मूरडायची…
लेकचरला मात्र मला बघून हसायची,
आणि इथेच माझी खूप गोची व्हायची…
किती प्रयत्न केले नसेल मी तुझ्याशी बोलायचे,
कधी क्लास मध्ये तर कधी लायब्ररीत गाठायचे…
पण तू नेहमी आपली खून्नस द्यायची,
कधी माझ्या सायकलीवर तर कधी माझ्या कपड्यांवर हसायची…
मला आज पण आठवतो तो लायब्ररीतला दिवस,
आत अंधूक प्रकाश आणि बाहेर पावसाचं सावट…
तू ‘इंजिनियरींग ड्राव्हिंगच्या’ सेक्शन जवळ उभी होतीस,
तुझं लक्ष जरी पुस्तकात असलं तरी तुझी सावली माझ्यासोबत बोलत होती
मी म्हंटल “हेल्लो” आणि तू म्हंटल “बावरट”,
मग काय बसलो मी माझ्या मनाच्या काचा आवरत ….
कधी कधी वाटतं तुझ्याशी खूप खूप बोलावं,
मनातलं ह्रिदयातलं एकदा सगळं सांगून टाकावं…..
बाहेर पावसाचे टपोरे थेंब पडत होते,
माझ्या मनाच्या खिडकीत मात्र ते अश्रुंसारखे गळत होते…
मी स्वतःला सावरत कसा बसा बाहेर पडलो,
पण त्या बेधुंद पावसाकडे बघून दारावरच अडलो…
तो पाऊस पण मला आज थांबवू शकत नव्हता,
आपल्या जगण्यात काही अर्थ आहे का, हा प्रश्न मला पडत होता…
कोणता असा गुनाह मी केला होता आज,
फक्त “हेल्लो” तर म्हणालो आणि तीनी ठेवला बावरटाचा ताज
मी इतका पण बावरट नाही हे मला सुधा कळतं,
पण तिच्या मनाला का नेहमी सगळा विपरीतच उमजतं…
नकळतच मी पावसात आता ओला-चिंब झालो होतो,
विचार करता करता जणू कुठे तरी आलो होतो
तेवढ्यात कोणी तरी माझा धरला हात,
समोरचा पाऊल पडण्या आधीच मारली हाक
वळून बघतो तर ती पण पावसात ओली चिंब भिजली होती,
पाऊस जरी थांबला होता तिच्या अश्रूंची सर मात्र पडत होती…
मी खरच करतो गं तुझ्यावर फार प्रेम,
आज माझ्या जवळ काही नसलं तरी फक्त आहे तुझ्याबद्दलच प्रेम
माझ्या हाताला घट्ट पकडून सव्तःला सावरत
ती म्हणली हे आधी का नाही रे तू बोलला… “बावरट”
दाट भरून आलेले ते ढग आता विस्कळीत झाले होते,
माझ्या अंधारमय जीवनात काही सोनरी पावलं आले होते
तिच्या डोळ्यांचे ते अश्रू हातांनी पूसत,
माझे मन त्या प्रेमाने ओले चिंब झाले होते
किती वर्ष झाले गं आज त्या गोष्टीला,
किती पावसाळे मी पहिले प्रत्येक दिव्शीला…
तरी आज पण वाटतं या पावसात बेधडक निघावं,
दूर कुठे तरी जाऊन ओले चिंब व्हावं
माघून येवून तू तो हात पुन्हा धरावं,
आणि कायमचा मला तुझ्यासोबत घेऊन जावं…
कधी कधी वाटतं तुझ्याशी खूप खूप बोलावं,
मनातलं ह्रिदयातलं एकदा सगळं सांगून टाकावं…..
मित्रांनो I know उशीर तर झाला आहे पण still मी संपूर्ण कविता तुमच्या समोर सादर करत आहे. I hope तुम्हला आवडेल.
तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा 🙂
– श्रीकांत
Zakaas!
I always knew you write well. Reading your stuff after a long and I enjoyed it. And yes, brought back lots of similar memories ;)…
-Ej
Thanx EJ 🙂 I am glad that this one brought back some beautiful memories…
Khup chan ahe yar ..
छान आहे कविता…आवडली…
Amazing Poem Shrikant. I was not knowing that you are a good poet. I liked this very much. Very nice composition! Wish to read more and more of these! Thanks for sharing
Kedar
Kedar… Thanx a lot for appreciating 🙂
This is my second marathi poem… I will try my best to deliver more….
पंकज, देवेन्द्र Thanks a lot for appreciating it 🙂
bhari layi bhari……..jabardast……awesome……stupendubulously fantastic……….i’m not getting more adjectives…….but damn good ……..keep it up bro………bas ek cheez puchni hai does the last line “आणि कायमचा मला तुझ्यासोबत घेऊन जावं…” means that she is no more with him……..if it is so, thats reallly very sad…….i hope its not like that………baki once again kudos to ur writing……
Thanks Buddy 🙂 Actually it means she is no more with him but she has spent a lifetime with him. I know its a little confusing. First para gives a clue that she is no more “भिंतीवरचा त्या फोटो समोर आपण किती काळ उभं राहावं” ……then a complete flashback how he was in love with her and how she has accepted that. The last para says she is no more and he is also not happy with his life and he wishes that she should approach him in the same way and this time she should take him with her. In other words he doesn’t want to live alone. You can say its a touching husband wife love story. Its like “log to guzar jatey hai per unka ahesas zinda rehta hai…..zindagi nikla jatti hai per wo pyaar zinda rehta hai” 🙂
SS bhai….you totally wowed me….No adjectives could summarise the state of awe I am into. What A beautiful expression and story!!! Keep it up boss…..way to go…..
Ekdam BESHT…. Keep it up dude…
Awesome.. Shiri bhai, I don’t remember when was the last time I read your blog, but after reading this poem HATS OFF to you.
Thank you Vaibhav Sir…… 🙂